Sugar factory, Latest Marathi News
देशातील साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आल्याने 'बी हेवी' मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली खरी, पण बंदी असतानाही ज्यांनी तयार करून ठेवले त्यांनाच फायदा होणार आहे. ...
साखरेसह उपपदार्थांना बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची एफआरपी देऊन सर्वच साखर कारखान्यांकडे पैसे जादा शिल्लक राहतात. पण, ते शेतकऱ्यांना दिले जात नसल्याचा गेल्या दोन वर्षातील अनुभव आहे. ...
चालू हंगामात अपेक्षेपेक्षा साखरेचे जादा उत्पादन झाल्याने २० लाख टन साखरेची निर्यात करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाने केली. मात्र, या मागणीला केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. ...
साखर निर्यातीला परवानगी दिली असती तर साखर कारखान्यांना पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ झाला असता. ...
राज्य शासन व महाराष्ट्रातील तमाम सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या शेती विभागाचा अंदाज चुकवून यंदाचा ऊस गाळप हंगाम बुधवारी समाप्त झाला. राज्यात यंदाच्या हंगामात १०७३ लाख टन गाळप झाले असून, ११० लाख टन साखर उत्पादन झाले. ...
उजनी धरणातील पाणीसाठा सध्या मायनस ५२ टक्क्यांच्या वर गेला असून, सोलापूर शहरासाठी आता १० मेपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडले गेले आहे. ...
देशातील साखर हंगाम संपल्यानंतर आता हे निर्बंध हटविण्यात आले असून देशभरात कारखान्यांकडे शिल्लक असलेल्या ऊस रस आणि मळीपासून तयार होणारे इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्याना दिले आहेत. ...
राज्यातील सर्व २०७ साखर कारखान्यांची धुराडी आता थंडावली असून साखर हंगाम संपला असल्याचे साखर आयुक्तालयाने जाहीर केले आहे. राज्यात आतापर्यंत ११०.१७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.२७ टक्के आला आहे. ...